Breaking

Wednesday, May 21, 2025

पंचसूत्री उपक्रम सर्व ग्रामपंचायतला राबवण्याचे टेंभुर्णी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे आवाहन


          


मुख्य संपादक : संतोष पांढरे(मोडनिंब)

सध्याच्या काळामध्ये गावामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच गावात शांतता प्रस्थापित करणे तसेच गावाची सुरक्षा अबाधित ठेवणे याकरिता प्रत्येक गावात ग्रामपंचायतने पंचसुत्री उपक्रम राबवणे आवश्यक आहे. शरीरा विरुद्धचे गुन्हे व मालमत्तेचे गुन्हे कमी करणे त्यावर प्रतिबंध करणे हे मुख्य काम वरील पंचसूत्री कार्यक्रमाने करता येईल.त्यासाठी प्रत्येक गावात सरपंचाने तसेच सर्व सदस्याने पोलीस पाटलांनी आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांनी पुढाकार घेऊन खालील पंचसूत्री उपक्रम राबवणे आवश्यक आहे 

तंटामुक्त समिती स्थापन करून ती कार्यान्वित करणे.

ग्राम सुरक्षा यंत्रणा चालू ठेवणे.

गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन करणे व ते ऍक्टिव्ह ठेवणे.

गावामध्ये महिला सुरक्षा समिती स्थापन करणे व ऍक्टिव्ह ठेवणे.

ग्रामपंचायतने गावात सीसीटीव्ही कॅमेरे चौका चौकात बसवणे.

            वरील पंचसूत्री उपक्रम राबवण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक पवार साहेबांनी सर्व ग्रामपंचायतला केले आहे.